hsc-exam-malpractice-maharashtra

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार समोर आले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट उपाययोजना केल्या असल्या तरी राज्यभरात तब्बल ४२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. त्यापैकी सर्वाधिक २६ प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या अंतर्गत नोंदवली गेली आहेत.

यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातील १,४०८ शाळा आणि महाविद्यालयांतून १,८५,३३० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षेसाठी विभागात ४६० परीक्षा केंद्रे आणि ५९ परीरक्षक केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.

विभागनिहाय कॉपी प्रकरणे:

परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ११ विद्यार्थी, जालना जिल्ह्यात ९, तर बीड, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही काही विद्यार्थी कॉपी करताना आढळले.

गंगापूर तालुक्यात दोन विद्यार्थी पकडले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. हरीओम ज्युनिअर कॉलेज, तुर्काबाद खराडी आणि राजे शहाजी कनिष्ठ महाविद्यालय, अंबेलोहळ या केंद्रांमध्ये प्रत्येकी एक विद्यार्थी गैरप्रकार करत असल्याचे भरारी पथकाने उघड केले. संबंधित विद्यार्थ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात असल्या तरीही गैरप्रकार थांबत नसल्याचे या घटनांमधून दिसून येते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

885 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क