छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, उष्णतेचा कहर वाढत चालला आहे. हवामान विभागाने पुढील दहा दिवस तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी, नागरिकांना गरमीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रविवारी कमाल तापमान ४१.६ अंश तर किमान तापमान २६.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. २१ ते ३० एप्रिल दरम्यान तापमानवाढीचा विक्रम होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एप्रिल महिना यंदा विक्रमी उष्णतेसाठी ओळखला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत प्रखर उन्हाचा चटका कायम आहे. रात्रीही गरम वाफा जाणवत असून गारव्याचा अभाव जाणवत आहे. लहान मुले, वृद्ध आणि रस्त्यावर काम करणाऱ्यांचे हाल होत आहेत.
**तारीखनिहाय तापमान आढावा :
| १५ एप्रिल | ४१.५ | २५.६ |
| १६ एप्रिल | ४१.४ | २५.५ |
| १७ एप्रिल | ४२.४ | २५.२ |
| १८ एप्रिल | ४१.२ | २६.९ |
| १९ एप्रिल | ४१.७ | २६.६ |
| २० एप्रिल | ४१.६ | २६.२ |
या तापमानाच्या आकडेवारीवरून १७ एप्रिल रोजी सर्वाधिक म्हणजे ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
उष्माघात टाळण्यासाठी उपाय –
– उन्हात थेट जाणे टाळा
– पुरेशी पाणी व द्रवपदार्थ घेणे
– हलके, पांढरे आणि सैलसर कपडे वापरा
– आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा
आरोग्य विभागाने नागरिकांना उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*