छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. येथील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. शेतजमिनीच्या वर्गवारी बदलाच्या कामासाठी खिरोळकर यांनी तब्बल ४१ लाखांची लाच मागितल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीला वर्ग २ मधील जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करायची होती. यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ४१ लाखांची मागणी केली होती. त्यापैकी २३ लाख रुपये आधीच स्वीकारण्यात आले होते. मात्र, उर्वरित १८ लाख रुपयांपैकी आणखी ५ लाख रुपये घेण्याचा प्रयत्न करत असताना ही कारवाई करण्यात आली.
खिरोळकर यांनी अव्वल कारकून त्रिभुवन यांच्या माध्यमातून ही लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसीबीने आधीच सापळा रचत ही कारवाई केली आणि दोघांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर जिल्ह्यात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, राज्यात मागील काही महिन्यांपासून लाचखोरीच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वीही परभणी जिल्ह्यात महिला क्रीडा अधिकारी, तसेच अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. आता छत्रपती संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरातही वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
एसीबी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लाचखोरीविरोधातील ही मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*