पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात खळबळ उडाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समिती (CCS) ची अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील वाढती दहशतवादी हालचाल आणि पाकिस्तानची भूमिका यावर सखोल चर्चा झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह विविध सुरक्षा यंत्रणांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात पाच कठोर निर्णय घेतले असून, हे निर्णय पाकिस्तानला मोठा धक्का देणारे आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देण्यात आली.

पाकिस्तानविरोधात घेतलेले पाच निर्णय पुढीलप्रमाणे आहेत

1. पाकिस्तानी दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2. पुढील 48 तासांत भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

3. सिंधू जल कराराला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

4. वाघा-अटारी बॉर्डर 1 मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

5. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.

भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी व्यापारी, राजनैतिक आणि पाण्याच्या कराराच्या माध्यमातून कडक भूमिका घेतली असून, या निर्णयांचा प्रभाव भारत-पाकिस्तान संबंधांवर दूरगामी पडणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले हे निर्णय कठोर असले तरी देशहितासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,045 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क