राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना २६ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
यंदा राज्यभरातील ४१९ शासकीय आणि ५८८ खासगी अशा एकूण १,००७ आयटीआय संस्थांमध्ये सुमारे १ लाख ५४ हजार जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये एक वर्ष कालावधीचे ४४ आणि दोन वर्ष कालावधीचे ३६ अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. १५ मेपासून सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १.३९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १.२५ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम केला आहे. यामध्ये ६८ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रमही भरले आहेत.
प्रवेशासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर हरकतींसाठी कालावधी देण्यात येईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ जुलै रोजी पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होईल. एकूण चार नियमित फेऱ्या, एक समुपदेशन फेरी आणि संस्थास्तरावरील प्रवेश फेरी अशा टप्प्यांतून ही प्रक्रिया पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांनी एकच अर्ज भरावा लागणार असून, एका मोबाईल नंबरवर एकच अर्ज स्वीकारला जाईल. अर्ज केल्यानंतर संबंधित आयटीआय संस्थेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*