शहराची स्वच्छता राखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे! ‘स्वच्छता क्रांती’ अभियानांतर्गत महानगरपालिकेने पानटपरीवाल्यांसाठी विशेष नियम लागू केले असून, शहरातील प्रत्येक पानटपरीवाल्याला आता दुकानाजवळ कचराकुंडी (डस्टबिन) आणि धुंकीपात्र ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कचऱ्यावर ‘कडक’ नियंत्रण!

शहरातील रस्ते, चौक, उद्याने, आणि मोकळ्या जागांवर गुटखा, पान मसाला, तंबाखू, आणि सिगारेटच्या रिकाम्या पाकिटांचा कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला आढळून आला आहे. या कचर्यामुळे शहरात अस्वच्छता निर्माण होत असल्याचे महानगरपालिकेच्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले. यावर तोडगा काढण्यासाठी, महानगरपालिकेने पानटपरीवाल्यांना त्यांच्या दुकानासमोर कचराकुंडी आणि धुंकीपात्र ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नियम मोडले तर ‘दंडाचा धक्का’!

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पानटपरीवाल्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. पहिल्या वेळेस 1,000 रुपये, दुसऱ्या वेळेस 2,000 रुपये, आणि तिसऱ्या वेळेस 3,000 रुपये दंड आकारला जाईल, अशी माहिती उप आयुक्त रविंद्र जोगदंड यांनी दिली आहे.

नागरिकांसाठी आवाहन: स्वच्छतेची जबाबदारी घ्या!

शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहन उप आयुक्त रविंद्र जोगदंड यांनी केले आहे. “आपण सर्वांनी मिळून या ‘स्वच्छता क्रांती’ला पुढे नेऊया!” या संदेशासह, शहरातील प्रत्येक नागरिकाच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या या कठोर निर्णयामुळे शहरातील स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे. “स्वच्छ छत्रपती संभाजीनगर, सुंदर छत्रपती संभाजीनगर!” या उद्दिष्टासाठी नागरिकांनी आता पुढाकार घ्यावा.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

736 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क