नवी दिल्ली : देशातील दहावीतील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. CBSE (Central Board of Secondary Education) बोर्डने २०२६ पासून दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नवी शिक्षण धोरण (NEP 2020) लागू करताना ही महत्त्वाची सुधारणा जाहीर करण्यात आली असून यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार आहे.

नव्या प्रणालीनुसार, पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होईल आणि ती सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. दुसरी परीक्षा मे महिन्यात होणार असून ती केवळ पहिल्या परीक्षेत समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल. या दोन परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याचे जास्त गुण असलेल्या परीक्षेचा विचार अंतिम निकालासाठी केला जाणार आहे.

या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्याची आणि चुका सुधारण्याची संधी मिळणार आहे. विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा या विषयांमध्ये सुधारणा करता येईल. यासोबतच, अंतर्गत मूल्यमापन (internal assessment) एकदाच वर्षाच्या सुरुवातीस केले जाणार आहे.

CBSE च्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत असून, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. एका परीक्षेच्या ताणाऐवजी सुधारणा करण्याची संधी मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी मानसिक दृष्टिकोनातूनही फायदेशीर बाब मानली जात आहे.

ही नवी परीक्षा पद्धत २०२६ पासून लागू होणार आहे आणि त्यानुसार शालेय वेळापत्रक व अभ्यासक्रमाचे नियोजन बदलले जाणार आहे. CBSE बोर्ड लवकरच या नव्या प्रणालीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

606 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क