नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयात रोजगार-लिंक्ड इंसेंटिव (Employment Linked Incentive – ELI) योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा उद्देश देशातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि उद्योग क्षेत्रात भरती वाढवणे हा आहे.
या योजनेंतर्गत, पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या युवकांना थेट ₹१५,००० प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. तसेच, या युवकांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक कर्मचाऱ्याबाबत ₹३,००० सब्सिडी दिली जाणार आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रालाही प्रत्यक्ष फायदा होणार आहे.
ही योजना ₹१.०७ लाख कोटींच्या निधीसह राबवली जाणार असून, अंदाजे ३.५ कोटी नवीन रोजगार संधी निर्माण होतील, असा सरकारचा दावा आहे. उत्पादन, सेवा, टेक्नॉलॉजी आणि डिजिटल क्षेत्रांमध्ये भरती वाढवण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, “ही योजना केवळ रोजगार देणारी नसून, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करणारी आहे. तरुणांच्या हाताला काम देणे हेच सरकारचे प्रथम कर्तव्य आहे.”
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष पोर्टल आणि अर्ज प्रणाली सुरू केली जाणार आहे. निकष, पात्रता आणि अर्ज पद्धती यासंबंधी लवकरच अधिकृत माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
ELI योजना ही नव्या पिढीला अर्थसक्षम आणि सन्मानजनक रोजगार मिळवून देण्याचा प्रभावी प्रयत्न ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*