छत्रपती संभाजीनगर : महावितरणने थकबाकीदारांकडून वीजबिल वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी (दि. १५) एकाच दिवशी तब्बल ३,४१३ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. या मोहिमेत मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळातील सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.

महावितरणने अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांना इशारा दिला असून, असे प्रकार आढळल्यास थेट पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील जवळपास ४ लाख ग्राहकांकडे २१५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली आहे.

मार्च महिन्यात झालेली कारवाई

  • संभाजीनगर शहर मंडळ: ३,४१४ ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित
  • संभाजीनगर ग्रामीण मंडळ: १,४८७ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद
  • जालना मंडळ: १,६११ ग्राहकांचे कनेक्शन तोडले

थकबाकीचा आकडा मोठा

  • संभाजीनगर शहर मंडळ: १.१२ लाख ग्राहकांकडे ५१.५४ कोटी रुपयांची थकबाकी
  • संभाजीनगर ग्रामीण मंडळ: १.७२ लाख ग्राहकांकडे ५५.५२ कोटी रुपयांची थकबाकी
  • जालना मंडळ: १.१४ लाख ग्राहकांकडे १०७.९३ कोटी रुपयांची थकबाकी

 

महावितरणच्या या कठोर कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, अनेक ग्राहक थकबाकी भरण्यासाठी वीज कार्यालयांमध्ये गर्दी करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

485 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क