छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अजिंठा लेणी येथे मधमाशांच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसून सलग दुसऱ्या दिवशीही मोठा हल्ला घडल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी झालेल्या या घटनेत तब्बल ९० पर्यटक जखमी झाले असून त्यात २ विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच लेणी परिसरात मधमाशांची असामान्य हालचाल सुरू होती. लेणी क्रमांक ९, १० आणि २६ परिसरातील मोठ्या मोहळांमधून अचानक मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. दिवसभरात तब्बल ५ ते ६ वेळा अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती झाली. आंध्र प्रदेशातील सुमारे ३० पर्यटकांसह एकूण ९० जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

घटनेनंतर पुरातत्त्व विभागाने तातडीने लेणी परिसर पर्यटकांसाठी बंद केला. जखमींना सुरक्षित स्थळी हलवून प्राथमिक उपचार देण्यात आले. विशेष म्हणजे, याच ठिकाणी गुरुवारीदेखील मधमाशांचा हल्ला झाला होता. त्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गेल्या दोन महिन्यांत ही सातवी घटना असून १८ फेब्रुवारीपासून ४ एप्रिलपर्यंत एकूण ३२१ पर्यटक जखमी झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मधमाशांच्या मोहळांचे वैज्ञानिक व्यवस्थापन, सुरक्षा पथके तैनात करणे आणि आपत्कालीन यंत्रणा मजबूत करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता प्रशासन नेमके काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

409 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क