छत्रपती संभाजीनगर: शहरात भामट्यांची टोळी सक्रिय झाली असून, पोलीस असल्याचे सांगत नागरिकांना गंडवण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना काल सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दिपनगर परिसरात घडली. या घटनेत दोन अनोळखी इसमांनी एका ५० वर्षीय महिलेची तब्बल १.४० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केली.

कशी झालीफसवणूक?

फिर्यादी महिला टीळकनगर, उल्कानगरी येथे राहणाऱ्या आहेत. त्या भाजीपाला खरेदीसाठी दिपनगर परिसरात गेल्या असता दोन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवले. स्वतःला पोलीस असल्याचे सांगत, “येथे वारंवार चोऱ्या होत आहेत, तुम्ही तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा” असा सल्ला दिला. घाबरलेल्या महिलेने त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत अंगावरील ६०,००० रुपये किमतीचे १ तोळ्याचे सोन्याचे चैन व ८०,००० रुपये किमतीच्या सव्वा तोळ्याच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढल्या. भामट्यांनी बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने गायब केले आणि पसार झाले.

पोलीस तपास सुरू

घटनेनंतर महिला जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सहायक फौजदार डफळ अधिक तपास करत आहेत.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

1. पोलीस कधीही अशा प्रकारे दागिने काढण्यास सांगत नाहीत. त्यामुळे अशी कोणतीही व्यक्ती संशयास्पद वाटल्यास लगेच पोलीस नियंत्रण कक्ष १०० वर फोन करा.

2. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. कोणतीही सूचना देताना त्यांच्या ओळखीची खातरजमा करा.

3. सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान दागिने घालण्याचे टाळा.

4. फसवणुकीची शंका आली तर त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याला कळवा.

शहरातील नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. अशा भामट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी सतर्कता बाळगा आणि पोलिसांना सहकार्य करा.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

705 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क