छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग निर्माण झाले असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या भाषणात यासंदर्भात भाष्य केल्यानंतर संभाजीनगरमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन काही ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
मनसेच्या निवेदनातील प्रमुख मुद्दे:
1. औरंगजेबच्या कबरीजवळ जर कुठलीही सजावट असेल, तर ती त्वरीत काढण्यात यावी.
2. यापुढे सरकारकडून कोणताही आर्थिक खर्च येथे करण्यात येऊ नये.
3. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक सहली औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी काढण्यात याव्यात
4. कबरीजवळ एक फलक लावण्यात यावा, ज्यावर “आम्हा मारण्यारांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला” असे लिहिले जावे.
5. संपूर्ण परिसरात सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, जेणेकरून कुणीही कबरीवर चादर चढवण्यास आल्यास त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येईल.
३० मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी इतिहास, सध्याची परिस्थिती आणि जातीय राजकारणावर भाष्य केले. संभाजीनगरच्या खुलताबाद भागात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीबाबत त्यांनी कडवट भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे ही मागणी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*